ताजे अपडेट

महाराष्ट्र – संत, शौर्य, भक्ती आणि कीर्तीची भूमी

पिठापूर येथे सत्संगातून महाराष्ट्राच्या वैभवाचा गौरव

महाराष्ट्र – संत, शौर्य, भक्ती आणि कीर्तीची भूमी

पिठापूर येथे सत्संगातून महाराष्ट्राच्या वैभवाचा गौरव

पिठापुरम ( आंध्रप्रदेश) : दिनांक ०४ फेब्रुवारी २०२६, nipakshsatyaguru.in

महाराष्ट्र ही केवळ एका राज्याची ओळख नसून शौर्य, संतपरंपरा, भक्ती, कला, क्रीडा आणि संस्कृतीचा जागतिक ठेवा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा आदर्श, पराक्रमी आणि दूरदृष्टी असलेला महान राजा या पवित्र भूमीत जन्माला आला. स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरवत अन्यायाविरुद्ध ठामपणे उभे राहणारे छत्रपती शिवाजी महाराज आजही संपूर्ण देशासाठी प्रेरणास्थान आहेत, असे प्रतिपादन पिठापूर येथील श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबर महाराज मंदिराचे ज्येष्ठ प्रधान पुजारी सुब्रमण्यम स्वामी व रामबाबू यांनी केले.


याच प्रसंगी सिन्नर (जि. नाशिक) येथील वारकरी संप्रदायातील भाविकांना मंदिरात कीर्तनरूपी सेवा करण्याची परवानगी देण्यात आली. ही परवानगी एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ग्रेड वन सौजन्या मॅडम यांनी दिल्याबद्दल , आणि भाविकांना मार्गदर्शन करण्यासाठी बी. डी. वाणी यांनी मोलाचे सहकार्य केले.  त्याच बरोबर भारतीय जनता पार्टीचे धुळे जिल्ह्याचे अध्यात्मिक उपाध्यक्ष सन्माननीय बी. डी. वाणी हे अध्यात्म, सामाजिक बांधिलकी आणि संघटनात्मक कार्य यांचा सुंदर समन्वय साधणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. पक्षाच्या विचारधारेला अध्यात्मिक अधिष्ठान देत समाजात संस्कार, नैतिकता व राष्ट्रभक्तीची भावना रुजविण्यासाठी ते सातत्याने कार्यरत आहेत. विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांतून त्यांनी सामान्य जनतेशी थेट संवाद साधत पक्षाची भूमिका प्रभावीपणे मांडली आहे. त्यांच्या संयमी स्वभावामुळे व सेवाभावी दृष्टिकोनामुळे धुळे जिल्ह्यात त्यांना आदराचे स्थान लाभले आहे.

नाशिक येथील प. प. श्री लोकनाथतीर्थ स्वामी महाराज महायोग ट्रस्ट समितीच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.
महाराष्ट्राने संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर माऊली, संत सोपान काका यांच्यासारख्या संतांच्या विचारांनी समाजाला अध्यात्माची दिशा दिली. पंढरपूरचा विठ्ठल हा महाराष्ट्राच्या जनजीवनाचा केंद्रबिंदू असून, वारकरी संप्रदायातून भक्ती, समता आणि मानवतेचा संदेश समाजात रुजविला जातो.
त्र्यंबकेश्वर येथील शिवकालीन व प्राचीन मंदिर महाराष्ट्राच्या धार्मिक व ऐतिहासिक वैभवाची साक्ष देणारे आहे. तुळजाभवानी माता हे शक्तीपीठ असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रमुख श्रद्धास्थान राहिले आहे. शिर्डी येथे साईबाबांसारख्या थोर संतांनी ‘श्रद्धा, सबुरी आणि सबका मालिक एक’ या संदेशातून महाराष्ट्राची कीर्ती जगभर पोहोचवली.
क्रीडा आणि कला क्षेत्रातही महाराष्ट्राने देशाला अभिमान वाटावा अशी उज्ज्वल परंपरा दिली आहे. क्रिकेट विश्वातील महान फलंदाज सचिन तेंडुलकर यांच्यासारखा खेळाडू महाराष्ट्राने देशाला दिला, तर संगीत क्षेत्रात स्वरकोकिळा लता मंगेशकर यांनी आपल्या अलौकिक स्वरांनी भारतासह महाराष्ट्राचे नाव जागतिक पातळीवर अजरामर केले.
इतिहासाच्या पानांवरही महाराष्ट्राचे शौर्य अजरामर आहे. वीर सावरकर यांच्या क्रांतिकारी विचारांनी प्रेरित होऊन समुद्रातून धाडसी सुटका करून घेतलेले शूरवीर क्रांतिकारक महाराष्ट्रात जन्मले, हे या भूमीचे महानत्व अधोरेखित करणारे आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना वैचारिक बळ देणारी भूमी महाराष्ट्राचीच होती, तर महिलांना शिक्षणाचा अधिकार मिळवून देणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांनी सामाजिक परिवर्तनाची मशाल पेटवून महाराष्ट्राची कीर्ती अधिक उज्वल केली.
दरम्यान, आंध्र प्रदेशातील पिठापूर येथे प. प. श्री लोकनाथतीर्थ स्वामी महाराज महायोग ट्रस्ट (मुख्य केंद्र – नाशिक, प. प. श्री नारायण काका ढेकणे महाराज आश्रम) यांच्या वतीने, ह. भ. प. बाळासाहेब देशपांडे (सिन्नर) यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित सत्संग कार्यक्रमात महाराष्ट्राच्या या वैभवाचा विशेष उल्लेख करण्यात आला.
या कार्यक्रमात उपस्थित असलेले ज्येष्ठ प्रधान पुजारी रामबाबू यांनी महाराष्ट्राची कीर्ती महान असल्याचे गौरवोद्गार काढले. महाराष्ट्रातून आलेल्या भाविकांवर त्यांनी प्रेम, आपुलकी व माणुसकीने केलेले सहकार्य भाविकांच्या मनात विशेष ठसा उमटवणारे ठरले. अशा बुद्धिवान व सद्गुणी व्यक्तींची भेट म्हणजे देव व संतांच्या सान्निध्याचे समाधान असल्याची भावना भाविकांनी व्यक्त केली.
संत, देवस्थान, शौर्यवान परंपरा, सामाजिक क्रांती आणि समृद्ध संस्कृतीमुळे महाराष्ट्र हे संपूर्ण देशाला दिशा देणारे राज्य आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी असून शूरवीर, कलाकार, खेळाडू आणि दैवतांची पावन धरती आहे. महाराष्ट्राची कीर्ती केवळ भारतापुरती मर्यादित नसून ती देश-विदेशात पोहोचलेली आहे, असे प्रतिपादन यावेळी करण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका